ह्या ब्लॉगचा मूळ गाभाच ‘गिर्यारोहण’ हा आहे. त्यामुळे गिर्यारोहणाशी निगडीत माहिती ह्या ब्लॉगमधून अधिक प्रसिद्ध केली जाते. याचे कारण गिर्यारोही पर्यटनही उत्तमच
करतात. पण गिर्यारोही दुर्गम प्रदेशात जात असल्याने तेथे ‘खबरदारी’ हा आणखी एक
महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो. गिर्यारोहणातील खबरदारी म्हणजे नक्की काय? यावरच
आजच्या लेखनात आपण विवेचन करणार आहोत. मुळातहा लेखच मुळात उशिरा प्रसिद्द होत आहे
याची जाणीव आहे तरीही ‘देर आये, दुरुस्त आये.’
गिर्यारोहण
ही एक धाडसी कला आहे. ह्याकलेची आवड असणाऱ्या व्यक्ती ह्या मुळातच धाडसी असतात
त्यामुळेच त्या ह्या कलेकडे आकर्षित होतात. गिर्यारोहणामध्ये निर्भेळ आनंद तर
मिळतोच पण त्यातून मिळणारा आत्मविश्वास हा अधिक महत्वाचा ठरतो. उत्तम पकड घेणारे ट्रेकिंगचे
बूट आणिथोरीफार खबरदारी घेतल्यास हा आनंद टिकवून ठेवता येईल.



कातळटप्पे
पार करणे: गिर्यारोहणातकातळटप्पे चढणे उतरणे नित्याचे असते. कोणताही कातळ (खडक) हा
सपाट नसतो. त्याला खाचा, खोबणी, खळगे, भेगा, उंचवटे, चिमटे, खड्डे असतातच. खडकाच्या
ह्याच वैशिष्ठ्यांचा वापर करून हे टप्पे पार करता येतात. खडक चढताना त्याच्याशी शक्यतो
घर्षण वाढेल अशा रीतीने चढाई करावी. आपले शरीर खडकाला लागेपर्यंत खडकाजवळ जावे. हात-पाय
ही आपल्या शरीराची चार टोके आहेत. खडक चढताना यातील किमान तीन टोकांवरील पकड मजबूत
असणे आवश्यक आहे. तसे असल्यासच चौथ्या टोकाने पुढील आधार चाचपडावा. त्याने आधार घ्यावा
आणि मग दुसऱ्या एका टोकावरील पकड सैल करावी. हीच क्रिया पुढे चालू ठेवल्यास सुरक्षित
तेने आपण तो टप्पा पार करू शकतो. टप्पा कठीण असल्यास बॅगा काढून खाली ठेवाव्यात
आणि असे टप्पे पार करावेत. नंतर दोरीने त्या वर ओढून घ्याव्यात.

फाजील आत्मविश्वास
बाळगू नये: प्रत्येक गिर्यारोहीने स्वतःच्या मर्यादा ओळखाव्यात. फाजील आत्मविश्वास
टाळावा.दुसरा करतो म्हणून मी सुद्धा सहज करू शकेन ही वृत्ती टाळावी. एखादे साहस
आवाक्याबाहेरचे असल्याची जाणीव झाल्यास मागे फिरावे. इतर लोक काय बोलतील याची
चिंता करू नये. अनुभवी नेता सोबत असल्यास त्याचे ऐकावे आणि त्या रीतीने वागावे. कोणत्याही
गोष्टीत अडून राहू नये. वायफळ जागी घाबरा-घाबरी करून इतर मंडळींचा आत्मविश्वास कमी
करण्यास कारणीभूत होऊ नये.कठीण टप्प्यात मजा-मस्करी करणे टाळावे. अशा ठिकाणी
बोलणे, अधिक काळ उभे राहणे, मोबाईलवर बोलणे, त्याच्याशी चाळा करणे टाळावे. सदैव
सावध असावे. इतरांना सावध राखावे. डोंगरांना योग्य तो मान द्यावा. ते आपली योग्य ती
काळजी घेतीलच.
चला
तर मग.. गिर्यारोहणातील खबरदारी पाळा.. डोंगरातील धोके टाळा..
No comments:
Post a Comment